एका चौकतील मोकळी जागा
हा आहे जुळे सोलापूर मधील भारती विद्यापीठासमोरल चौक.अलीकडे मी रोज पाहतोय कि इथे काही कार्यकर्ते बसलेले असतात.ते आम आदमी पक्षाची सदस्य नोंदणी करीत आहेत.चार-पाच लोक असतात रोज आज एक होता.मला आश्चर्य वाटतंय की या पक्षाने देशभर पाय पसरवण्यासाठी जी वाटचाल केली आहे ती जमिनी लेव्हल पासून आहे.बाकी पक्ष कार्पोरेट झालेत.ते अशी नोंदणी घेत नाहीत. कदाचित कधीकाळी हा पक्ष ही केंद्रात सत्ता बनवेल? आजच एक बातमी वाचली की या पक्षाने आपल्याच मंत्र्याला तुरुंगात टाकले.ही खूप सकारात्मक बातमी आहे.आजच्या युगात तर खूप महत्वाची,हे असे व्हायला हवे.
